“वय वाढले की विसरणे सुरू होते” – हे खरे आहे. खूप लोकांना असे वाटते की वय वाढले की स्मरणशक्ती आपोआप कमी होते. नाव विसरणे, वस्तू कुठे ठेवल्या ते आठवत नाही, एखादी गोष्ट सांगताना मध्येच थांबणे – हे सगळे वाढत्या वयात दिसू शकते. पण प्रत्येक वेळी याचा अर्थ गंभीर आजार असा नसतो.
साधारणपणे 50–60 वर्षांनंतर मेंदूची कार्यक्षमता थोडी कमी होऊ लागते. माहिती लक्षात ठेवायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण हे पूर्णपणे नैसर्गिक बदल असू शकतात.
साधे विसरणे आणि गंभीर समस्या यात फरक काय?
साधे वयामुळे होणारे विसरणे म्हणजे:
- कधीकधी नाव विसरणे
- कुठे काय ठेवले आहे ते आठवायला वेळ लागणे
- ओळखीच्या व्यक्तीचे नाव लगेच आठवू न येणे
पण जर खालील लक्षणे दिसत असतील तर लक्ष द्यायला हवे:
- रोजच्या कामात अडचण येणे
- घराचा रस्ता विसरणे
- एकच प्रश्न वारंवार विचारणे
- पैशांचा व्यवहार नीट न जमणे
अशा वेळी हे डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारख्या आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
स्मरणशक्ती कमी होण्यामागची कारणे:
वय वाढणे हे एक कारण आहे, पण ते एकटंच कारण नसते. इतर कारणे अशी असू शकतात:
- उच्च रक्तदाब
- डायबिटीज
- थायरॉईड समस्या
- झोप नीट न लागणे
- ताण आणि नैराश्य (Depression)
- Vitamin B12 ची कमतरता
- स्ट्रोकचा इतिहास
म्हणूनच, फक्त “वय झाले म्हणून विसरतोय” असे म्हणणे योग्य नाही.
केव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
जर विसरणे वाढत चालले असेल आणि रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर तज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करणे गरजेचे आहे. योग्य वेळी तपासणी केली तर अनेक कारणे उपचाराने सुधारू शकतात. मेंदूचे काही टेस्ट, रक्त तपासणी आणि गरज पडल्यास स्कॅन करून योग्य निदान केले जाते..
स्मरणशक्ती टिकवण्यासाठी काय करावे?
स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी मदत करू शकतात:
- दररोज हलका व्यायाम
- पौष्टिक आहार (फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स)
- पुरेशी झोप
- वाचन, कोडी सोडवणे, नवीन गोष्टी शिकणे
- सोशल ऍक्टिव्ह राहणे
मेंदूला सतत सक्रिय ठेवले तर त्याची क्षमता जास्त काळ टिकून राहते.
वय वाढल्यावर थोडं विसरणे सामान्य आहे. पण जर स्मरणशक्ती खूपच कमी होत असेल, रोजच्या कामात अडथळे येत असतील, तर ते दुर्लक्षित करू नये. योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास स्थिती सुधारता येऊ शकते.
Ekvira Healthcare मध्ये अनुभवी डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन आणि तपासणी सुविधा उपलब्ध आहेत.
World Cancer Day: कर्करोगाबद्दल जनजागृती का गरजेची आहे? -> CLICK HERE